मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोनानं रुप बदललं! फक्त फुफ्फुस नाही तर 'या' अवयांवरही करतोय हल्ला, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनानं रुप बदललं! फक्त फुफ्फुस नाही तर 'या' अवयांवरही करतोय हल्ला, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाव्हायरसनं (Coronavirus) 7 महिन्यांआधी भारतात प्रवेश केला. तेव्हा पासून आतापर्यंत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.

कोरोनाव्हायरसनं (Coronavirus) 7 महिन्यांआधी भारतात प्रवेश केला. तेव्हा पासून आतापर्यंत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.

कोरोनाव्हायरसनं (Coronavirus) 7 महिन्यांआधी भारतात प्रवेश केला. तेव्हा पासून आतापर्यंत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.

नवी दिल्ली, 13 जुलै : कोरोनाव्हायरसनं (Coronavirus) 7 महिन्यांआधी भारतात प्रवेश केला. तेव्हा पासून आतापर्यंत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांत एकाच दिवशी जवळजवळ 25 हजारहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. दुसरीकडे या आजारावर लस आणि औषधं शोधण्याचे प्रयत्नही केले जात आहे. यातच आता कोरोनानं आपलं रुप बदललं आहे. आता कोरोनाव्हायरस रुग्णांच्या केवळ फुफ्फुसांवर हल्ला करत नाहीत तर मेंदू, किडनी आणि हृदयाचेही मोठे नुकसान होत आहे. याचा खुलासा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थान (AIIMS) संचालक रणदीप गुलेरिया यांनी केला आहे.

एकाच वेळी अनेक अवयवांवर हल्ला

देशातील कोरोना क्लिनिकल रिसर्च टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी या कोरोनाच्या बदलत्या प्रकाराबद्दल इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसची संवाद साधला. यावेळी ते 'सिस्टेमिक डिजीज' (systemic disease) झाला आहे असे म्हणाले. विज्ञानाच्या भाषेत, त्या रोगास 'सिस्टेमिक रोग म्हणतात, जे एकाच वेळी शरीराच्या अनेक अवयवांवर आक्रमण करते. ते म्हणाले की कोरोनामधून बरे झाल्यानंतरही बर्‍याच रूग्णांच्या फुफ्फुसाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांनंतर रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागत आहे.

वाचा-कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी, देश पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर

धोकादायक होत आहे कोरोना

डॉ. गुलेरिया असेही म्हणाले की, आता कोरोना अत्यंत धोकादायक झाला आहे. आधी हा आजार न्यूमोनियासारखा असावा, असे आम्हाला वाटले होते. त्यानंतर रुग्णाचे रक्त गोठत असल्याचे चित्र दिसले. यामुळे फुफ्फुस आणि हृदय बंद होऊ लागले आणि लोकांचा मृत्यू झाला. आता कोरोना मेंदूवरही हल्ला करू लागला आहे. या व्यतिरिक्त लोकांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत. सुरुवातीला आम्हाला वाटले की हा काही फार मोठा आजार नाही, पण आता ही एक गंभीर समस्या बनली आहे.

वाचा-सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिनेत्री रेखा यांचीही होणार टेस्ट 

तीन महिन्यानंतरही व्हायरसचा परिणाम

डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार सीटी स्कॅनमध्ये असेही दिसून आले आहे की, निरोगी झालेल्या रुग्णांना तीन महिन्यांपर्यंत फुफ्फुसांचा त्रास होतो. तर बर्‍याच लोकांना अजूनही ऑक्सिजनची गरज भासत आहे. ते असेही म्हणाले की कित्येक आठवड्यांनंतरही लोक तक्रार करतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोक म्हणतात की त्यांना कामावर जाण्याची हिंमत नाही. ते असेही म्हणाले की बर्‍याच रूग्णांमध्ये असेही दिसून आले आहे की त्याला गंभीर न्यूरोलॉजिकल त्रास होत आहेत.

वाचा-चीनचा होणार पदार्फाश; वुहान लॅबचे तज्ज्ञ अमेरिकेच्या संपर्कात

First published:
top videos

    Tags: Corona, Corona virus in india