मुंबई, 20 एप्रिल: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस (Congress) आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या संकट काळात काँग्रेस नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मनमोहन सिंग पत्र लिहून सल्ला दिला. मात्र, यांनी याच सूचना महारष्ट्र सरकारने का दिल्या नाहीत?
आज कोरोना संसर्गाच्या एकूण टक्केवारीनुसार 35 ते 40 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 35 ते 37 टक्के आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग होता मग त्यावेळी राज्य सरकारने तयारी का केली नाही? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
35-40% of total cases & 35-37% of active cases are in Maharashtra.Why did it not prepare when it was worst affected last time? Priyanka, Rahul & Sonia Gandhi, Manmohan ji wrote letter&held press conferences to set narrative.Why did they not suggest Maharashtra?: Devendra Fadnavis
— ANI (@ANI) April 21, 2021
वाचा: 'महाराष्ट्रात Lockdown लागणार नाही तर...' मोदींच्या आवाहनानंतर राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं, असं दिसत आहे की, "काँग्रेस आणि गांधी परिवार नकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. प्रियंका गांधींना विचारु इच्छितो की, कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीसंदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली का? तेथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं का? कोरोनामुळे एकूण मृत्यूंपैकी 38 ते 40 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत."
प्रियंका गांधींनी मोदींवर केली होती टीका
देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनामुळे लोक मृत्यूमुखी पडत आहेत आणि ते मोठ मोठ्या सभांमध्ये जाऊन हसत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ आपली प्रतिमा चमकवण्याच्या मागे लागलेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Devendra Fadnavis, Priyanka gandhi