वायनाड, 4 एप्रिल : ''ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार बघत आहेत त्यावरून भाषेवर आणि ईतीहासावर आक्रमण होत असल्याची भीती केरळमधील जनतेच्या मनात आहे. त्यामुळेच मी केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला'', अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. वायनाड येथे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रचार रॅली दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या माध्यमातूनच मी संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cochin Kerala Lok Sabha Elections 2019, Election 2019, Lok sabha election 2019