पाटना, 9 ऑगस्ट : बिहारमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. यादरम्यान जदयूने भाजपसोबत असलेली युती तोडली आहे. काही वेळापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी बिहारचे राज्यपालांना आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजीनाम्यानंतर मीडियाशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी एनडीओ सरकारमधील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भाजपसोबत एक नव्हे अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत लवकरच त्यांचे नेते याबाबत सविस्तर भूमिका मांडतील असंही ते म्हणाले.
काल भाजप नेते अमित शहा यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याचंही वृत्त समोर आलं होतं. जदयूने याचा दावा केला होता. यात बिहारमधील सत्ता वाचवण्यासाठी शहांकडून शेवटचा प्रयत्न असल्याचंही म्हटलं होतं. मात्र शहांच्या कार्यालयातून मात्र फोन कॉलबाबत नकार देण्यात आला होता.
Nitish Kumar resigns as Chief Minister of Bihar, breaks alliance with BJP#BiharPoliticalCrisis pic.twitter.com/GwtSlL2KG8
— ANI (@ANI) August 9, 2022
160 आमदारांचं समर्थन...
नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर जदयूकडून दावा केला जात आहे की, त्यांच्याजवळ 160 आमदारांचं समर्थन आहे. सर्वांची इच्छा होती की, भाजपसोबतची युती ठेवू नये. आमदार आणि खासदारांचं मत लक्षात घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Bihar, Nitish kumar