नवी दिल्ली, 6 मार्च : अयोध्या वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. अयोध्या वादात मध्यस्थीद्वारे प्रश्न सोडवण्यात येऊ शकतो का, याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 'हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवायचं की नाही, याबाबतचा निर्णय पुढच्या सुनावणीत केला जाईल,' असं सुप्रीम कोर्टाने 26 फेब्रुवारीला म्हटलं होतं.
'दोन्ही बाजूंनी चर्चेद्वारे मार्ग काढण्याबाबत विचार करावा. जर चर्चेची थोडीदेखील शक्यता असले तर त्याबाबत प्रयत्न व्हायला हवा,' अशा सूचना मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेखालील पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने दिल्या होत्या.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात गेल्या अनेक वर्षांपासून मोठा वाद सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण वर्षानुवर्ष न्यायालयात आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकूण सुवर्णमध्य साधण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
VIDEO: अक्षय कुमारची भन्नाट एन्ट्री; लवकरच झळकणार 'या' सीरिजमध्ये