मराठी बातम्या /बातम्या /देश /पेट्रोलच्या किंमती लवकरच आटोक्यात - अमित शहा

पेट्रोलच्या किंमती लवकरच आटोक्यात - अमित शहा

'पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाय शोधत असून लवकरच तोगडा निघेल'

'पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाय शोधत असून लवकरच तोगडा निघेल'

'पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार उपाय शोधत असून लवकरच तोगडा निघेल'

    नवी दिल्ली, ता. 16 सप्टेंबर :पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमागे आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचेही ते म्हणाले. तेलाच्या किंमती ठरवण्याचा अधिकार आता केंद्राकडे राहिला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये चढ उतार होतात तसे दर कमी जास्त होतात. लोकांना त्रास सहन करावा लागतोय याची केंद्र सरकारला जाणीव असून तेलाच्या किंमती कमी करण्याचे उपाय शोधणं सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

    आजही वाढले तेलाचे भाव

    गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात २८ पैसे तर डिझेलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे दर ८९ रुपये २९ पैसे, तर डिझेल ७८ रुपये २६ पैशांवर गेलंय. शनिवारीही पेट्रोल ३४ पैशांनी महागलं होतं. म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत आज पेट्रोल एक रुपयानं वाढलंय. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलाचे दर कमी होत नाहीयेत, आणि केंद्र आणि राज्य सरकारं कर कमी करत नाहीयेत.. त्यामुळे सामान्य माणसाला इंधन दरातून दिलासा मिळत नाहीये.

    आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांनी तेलावर राज्य सरकार लावत असलेल्या टॅक्समध्ये कपात केल्यानं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. तर राज्य सरकार तेलाच्या किंमती कशा कमी करता येतील याचा आढाव घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

    दरवाढीची मला झळ नाही - आठवले

    देशभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे तीव्र असंतोष असताना आठवले म्हणाले मी मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा मला फटका बसत नाही. कारण मला सगळचं मोफत मिळतं. माझं मंत्रीपद गेलं तर मात्र मला त्याची झळ बसेल. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होतेय. नंतर सावरून घेत आठवलें म्हणाले या दरवाढीची सामान्य माणसांना झळ बसत असल्याने केंद्र सरकारने तेलाचे दर कमी केले पाहिजे. राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.

     

     

    'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'

    First published:

    Tags: Amit Shah, Naendra modi, Petrol and diesel price, Ramdas athawale