केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांवरून अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाने आता दुसरा मोठा निर्णय घेत एनडीएमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे ती मागे घेतली जावीत अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जवळे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभा निवडणुकीनंतर बेबनाव झाल्याने शिवसेना भाजपपासून दुरावला गेला. त्यामुळे भाजप शिवसेनेची 27 वर्षांची युती तुटली होती.All I want to say is that our demand for Gorkhaland still remains, we will take this cause forward. It is our aim, our vision. In the 2024 election, we will support the party which will take up this cause: Bimal Gurung, Gorkha Janmukti Morcha, in Salt Lake, Kolkata. #WestBengal pic.twitter.com/91PSnnFU9r
— ANI (@ANI) October 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.