मराठी बातम्या /बातम्या /nagpur /'...तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं' : देवेंद्र फडणवीस

'...तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं' : देवेंद्र फडणवीस

(फाईल फोटो)

(फाईल फोटो)

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

नागपूर, 16 ऑक्टोबर : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात भ्रष्ट सरकार (Corrupt government) आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं स्वप्न दाखवून यांनी पाठ दाखवली. राज्यात मोठी दलाली सुरू आहे. आयटीच्या रेडमध्ये लक्षात आलंय की काही मंत्र्यांनी वसूलीचं सॅाफ्टवेअर तयार केलंय असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

... तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत. ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करु देत नाहीत. एजन्सीच्या कामात ते मध्ये येत नाही आणि वापरही करत नाहीत. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं. पण आण्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.

वाचा : "आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत" नितेश राणेंचा खोचक टोला

गेल्या काळात काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेतेही करणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे भ्रष्टाचार खनुन काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, आयटी विभागाच्या छापेमारीतून जे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नको. राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे... खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच.

जनतेशी बेईमानी करुन सत्तेत

देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करुन तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा पूर्ण झाली आम्हाला दोष देऊ नका.

एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं फ्रस्टेशन होईल आणि शाच प्रकारचं वक्तव्य निघेल. मी केवळ इतकंच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरील, पैसा वापरली तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nagpur, Uddhav tahckeray