मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'मी कुठे म्हटलो माझ्या काकांना जानता राजा म्हणा', अजित पवारांनी सुनावलं

'मी कुठे म्हटलो माझ्या काकांना जानता राजा म्हणा', अजित पवारांनी सुनावलं

 'मी योग्य पणे भूमिका मांडली. ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा

'मी योग्य पणे भूमिका मांडली. ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा

'मी योग्य पणे भूमिका मांडली. ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी :  'आम्ही कुठे म्हटलो जानता राजा म्हणून वापरा. मी म्हटलो का, माझ्या काकांना जानता राजा म्हणा. जानता राजा म्हणा, ज्यांनी हा शब्द प्रयोग वापरला, त्याला जाऊन विचारा, आम्हाला कशाला विचारता, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुनावलं.

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये, असं वक्तव्य अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात निदर्शनं सुरू केली. अखेर अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड भूमिका मांडली.

जानता राजा हा शब्द शरद पवारांना वापरला जातो असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला असा सवाल पत्रकारांनी केला असता, अजित पवार म्हणाले की, 'आम्ही कुठे म्हटलो जानता राजा म्हणून वापरा. मी म्हटलो का, माझ्या काकांना जानता राजा म्हणा. जानता राजा म्हणा, ज्यांनी हा शब्द प्रयोग वापरला, त्याला जाऊन विचारा, आम्हाला कशाला विचारता, असंही अजित पवारांनी सुनावलं.

(शिंदे गट, 'पीपल्स रिपब्लिकन' युतीची अखेर घोषणा; मुख्यमंत्र्यांनी पुढचा प्लॅनही सांगितला)

छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराजरक्षक म्हणावे असा माझा आग्रह आहे. शरद पवार यांनीही भूमिका मांडली की, ज्यांना धर्मवीर म्हणायचं असेल तर हरकत नाही. शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचे रक्षण करत असताना त्यामध्ये सर्वच गोष्टी येत असतात. स्वराज्याचं रक्षण संभाजी महाराज यांनी केलं, त्यामुळे स्वराज्यरक्षक म्हणेच योग्य आहे. मी असं कोणतेही अपशब्द वापरले नाही. कोणतीही चुकीचे विधान केले. उलट शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर भूमिका मांडावी, असं म्हणत अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली.

'मी योग्य पणे भूमिका मांडली. ज्यांना पटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावं. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका घ्यायची ती घ्यावी, असंही अजितदादांनी भाजपला सुनावलं.

संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणावे की धर्मवीर म्हणावे असा प्रश्न आहे, तर स्वराज्यरक्षकच म्हणावे हीच माझी भूमिका आहे. परंतु, शरद पवार ज्या प्रमाणे म्हणाले, ज्यांना धर्मवीर म्हणायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे, असंही पवार म्हणाले.

(कोण कुणाला जेलमध्ये पाठवणार? दीपक केसरकर आणि संजय राऊतांमध्ये जुंपली)

'आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि ज्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरून मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य वाचलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा शिवरायांची उपमा मुख्यमंत्री शिंदेंना दिली होती. प्रसाद लाड यांनीही शिवरायांच्या जन्मचा नवा जावई शोध लावला होता. गोपीचंद पडळकर यांनीही अफजल खानाने शिवरायांचा कोथळा बाहेर काढला असं विधान केलं होतं. त्यांनी वक्तव्य करूनही माफी मागितली नाही. त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही, याची दखल महाराष्ट्राने घ्यावी, असंही अजित पवारांनी आवर्जुन सांगितलं.

इतिहासाची नव्याने मांडणी होत असते, रामदास स्वामी, दादाजी कोंडदेव यांचे गुरू नाही. हे इतिहासकारांनी मांडलं. ते राज्य सरकारने स्विकारलं त्यानंतर राज्य सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला, असंही अजित पवार म्हणाले.

First published:

Tags: अजित पवार