मुंबई, 06 जुलै : सोशल मीडियावरील अफवांमुळे धुळ्यात ५ जणांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे आता असा प्रकार पुन्हा घडू नये याकरता राज्यातील सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून यासाठी पोलिसांनी व्हॉटसप ग्रुपवर करडी नजर ठेवायला तर सुरुवात केलीये. शिवाय पोलीस आता अनेक सोशल व्हॉटसप ग्रुपमध्ये सामील होतायेत.
हेही वाचा
५६ इंच छातीपेक्षा, छातीवर किती मेडल आहेत त्याला अधिक महत्त्व- उद्धव ठाकरे
मुंबई पोलीसही याबाबत खडबडून जागे झाले अाहेत. मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचारी जास्तीत जास्त खासगी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभाग होतील. ज्या ग्रुपमध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती आली तर ती अन्य ग्रुपमध्ये जाण्यापासून रोखेल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिलीये.
धुळ्यात संशयावरून झालेली 5 जणांची हत्या ही व्हाॅटसअॅपवरच्या अफवेमुळेच झाली होती.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर जर अत्याचार झाले तर त्यासाठी दाद मागण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे सायबर समितीची स्थापना केली. या कमिटीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 10 व्यक्तींचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police, Rumours, Whatsapp, Whatsapp group