— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 6, 2022त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करण्यात यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो आहे. या एसआयटीने बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. वाचा : सुरक्षेच्या कारणामुळे मोदींची रॅली रद्द, चंद्रकांत पाटलांचा पंजाब सरकारवर निशाणा
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 6, 20221. SIT मार्फत तपास मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात वापर असलेल्या 19,000 हून अधिक विहिरींमधूर प्रत्येकी किती प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा सध्या होत आहे व तो किती असायला हवा. 2. ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरीक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. 3. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झाला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्यात यावे. 4. तसेच मुंबई आणि मुंबई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्यकता लक्षात घेऊन आवश्यक असणारे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सर्व महापालिकांनी स्वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्वयीत करण्याबाबत कार्यवाही करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Mumbai, Water