मुंबई, 10 मे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या भेटीचा एक किस्सा त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. सध्या या किस्स्याची मोठी चर्चा सुरू आहे.
मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करण्यासाठी म्हाडाकडून घरं उपलब्ध करुन देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाडांनी केली होती. हे आश्वास पवारांच्या लक्षात होतं. त्यामुळे भेट झाल्यानंतर पवारांनी आठवणीने त्याची विचारणा केली. त्यावर आव्हाड म्हणाले, घरे तयार आहे, चाव्याही तयार आहेत. यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मग उशीर कशाला?
काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला... कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2021
मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.#साहेब#ऊर्जास्रोत pic.twitter.com/UWEiEa7qlQ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2021
नेमका काय आहे तो किस्सा
त्याचं झालं असं की, काल अचानक जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर शरद पवारांनी पहिलाच प्रश्न कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या घराबद्दल विचारणा केली. त्यानंतर आव्हाड म्हणाले की, साहेब घरं तयार आहेत, चाव्याही हातात आहेत. त्यावर पवार म्हणाले की, मग उशीर कशाला? यानंतर आव्हाड म्हणाले की, आपल्या तारखेची वाट पाहतोय. यावर साहेब म्हणाले, ठीक आहे या आठवड्यातच कार्यक्रम करुन टाकू. पहिलं त्यांना घरं दिली पाहिजेत. या घटनेचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ज्यावर मोठी चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Jitendra awhad, NCP, Sharad pawar