मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /औरंगाबाद नामांतराचा वाद शिगेला, ट्विटमध्ये संभाजीनगर उल्लेखाने बाळासाहेब थोरात भडकले

औरंगाबाद नामांतराचा वाद शिगेला, ट्विटमध्ये संभाजीनगर उल्लेखाने बाळासाहेब थोरात भडकले

संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे.

संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे.

संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे.

मुंबई, 6 जानेवारी : औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर व्हावे, या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे, ही शिवसेनेची जुनीच मागणी असली, तरी महाविकास आघाडीत सत्तेत असताना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा चांगलाच रंगला आहे. संभाजीनगर या नामकरणाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे. मात्र आता माहिती जनसंपर्क संचनालयाच्या एका ट्विटने या वादात चांगलेच तेल ओतले आहे

मंत्रिमंडळ बैठकीतील एका निर्णयाचे ट्विट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) करताना या निर्णयात संभाजीनगर असा सरकारी उल्लेख करण्यात आला आहे, तर औरंगाबाद हा उल्लेख कंसात करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय येथील खाटांची संख्या 165 करण्यात आल्याचे  आणि 360 नव्या पदांना मान्यता देण्यात आल्याचे हे ट्विट आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिककार्य मंत्री, लातूरचे काँग्रेस नेते अमित देशमुख यांचा फोटो लावून हे ट्विट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही हे ट्विट केले आहे.

यावरुन औरंगबादचे नामकरण हे संभाजीनगर झाल्याची शासकीय पुष्टीच मिळाल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना राग आवरता आलेला नाही. त्यांनीही ट्विट करत माहिती व जनसंपर्क संचालयनालयाला आणि सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

या ट्विटवरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद थेट चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक निर्णयांत काँग्रेसला डावलले जात असल्याने काँग्रेसचे मंत्री आधीपासूनच नाराज आहेत. महाविकास आघआडीतील किमान समान कार्यक्रमांवर सरकार चालावे, याबाबतचे पत्र खुद्द सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे, यातच हा नामांतराच्या वादावरुन आघाडी सरकारसमोर आव्हान निर्माण झाल्याचे दिसते आहे.

First published:

Tags: Balasaheb thorat, Shivsena