मुंबई, 20 जून : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaiks letter ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत 'विनाकारण कोण त्रास देत आहे हे शोधलं पाहिजे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोजक्यात शब्दांत आपली प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचे टाळलं.
'सरनाईक यांनी मत मांडले त्यावर प्रतिक्रिया द्यावे, असं काय आहे. मुळात विनाकरण त्रास दिला जात आहे, असं ते म्हणतात विनाकरण कोण त्रास देतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
आलियामुळं करण जोहर झाला पिता? पितृदिनाच्या शुभेच्छा देत व्यक्त केल्या भावना
तसंच, या पत्रातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. विनाकारण महाविकास आघाडीतील नेत्यांना कोण त्रास देतंय याचा विचार केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले प्रताप सरनाईक आपल्या पत्रात?
'गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र, आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत. अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एक विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का? असा सवाल सरनाईक यांनी उपस्थितीत केला.
तसंच, 'आपण आपल्या पदाला न्याय दिला आहे व देत आहा. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरू आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे' असंही सरनाईक म्हणाले.
'पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.' असंही सरनाईक म्हणाले आहे.
लसीकरणाच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करायची आहे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut