मुंबई, 10 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या भेटीमुळे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. पण, या केवळ शंका आणि वावड्या आहे. यात जर तरचा विचार करण्याची गरज नाही. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आहे. शिवसेना हा विश्वासाचा पक्ष आहे, असंही म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन (22nd anniversary of the Nationalist Congress Party) साजरा होत आहे. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी दिल्लीतील मोदी आणि ठाकरेंच्या भेटीवर जाहीर भाष्य केलं.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असं माझ्या वाचण्यात आलं. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. पण, शिवसेनेसोबत आपण काम कधी केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे' असं शरद पवार म्हणाले.
तुमच्याकडे आहे हे 2 रुपयाचं नाणं तर घरबसल्या कमवा 5 लाख रुपये, वाचा काय आहे ऑफर
यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत किस्सा सांगितला ' जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे आला होता. तो नुसता पुढे आला नाहीतर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी एक सुद्धा उमेदवार उभा केला नव्हता. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी कधी केला नाही. इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात भूमिका घेतली होती ती पाहता, काही जण आखाडे बांधत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल', असं पवारांनी ठणकावून सांगितलं.
'या संकटावर आपण मात करू शकतो हा विश्वास त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केला. राजकारणात सतत नवीन पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे. उद्या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे त्यांना ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण त्यांना तयार केले पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.
तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे. लाखांच्या संख्येनं आपण जमलो आणि शिवाजीपार्कवर जमलो आणि महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. हा निर्णय संपूर्ण देशानी लोकांनी स्विकारला, असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.