तसंच, या प्रकरणात ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. विशेष म्हणजे, रोहित पवार यांनी #सत्यमेवजयते असा हॅशटॅगही वापरला. नागपूर हादरलं, अवघ्या 2 तासांपूर्वी जन्मलेलं बाळ रस्त्यावर फेकलं! सुशांत प्रकरणात जेव्हा भाजप नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा खुद्द पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच संतापले होते. 'मी माझ्या नातव्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे', असं म्हणत पवारांनी नातवाचे कान उपटले होते.बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.#सत्यमेवजयते
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020
पण, तरीही पार्थ पवार हे वारंवार आपल्याच पक्षाविरोधात वेगळी भूमिका मांडत होते. सुशांत प्रकरणाचा तपास जेव्हा सुप्रीम कोर्टाने सीबीआयला देण्याचा निर्णय दिला होता. खरंतर एका प्रकारे हा ठाकरे सरकारला धक्का होता. पण, 'सत्यमेव जयते' म्हणत पार्थ यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती.With the whole country, especially youth, seeking a proper investigation into the death of Late Sushant Singh Rajput, I urged Hon. @AnilDeshmukhNCP ji to take national emotions into consideration & initiate a CBI investigation.@HMOIndia @AmitShah @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/NvHk4wH8nV
— Parth Pawar (@parthajitpawar) July 27, 2020
त्यामुळेच आता रोहित पवार यांनी सत्यमेव जयते म्हणत एका प्रकारे पार्थ यांना चांगलाच टोला लगावला आहे. काय आहे एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रिपोर्ट? सुशांत प्रकरणात दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.