राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे. दरम्यान, राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमते एवढच हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर– सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सगळ्यांनी तंतोतत पालन करावे असं आवाहन सरकारने केले आहे.Clicked this picture with our Police Personel at Chowpati, Mumbai. I have no words to express my gratitude. Big Thank You once again for protecting and taking care of us. pic.twitter.com/oNLjXc2mvH
— Supriya Sule (@supriya_sule) October 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Police, Supriya sule