मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा घणाघात

सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधात ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले, संजय राऊतांचा घणाघात

'ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता'

'ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता'

'ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता'

मुंबई, 07 फेब्रुवारी :  'दिल्लीच्या (Delhi) सीमेवरील गाझीपूरला शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय. हा आपल्या देशात हस्तक्षेप असल्याचा अपप्रचार सुरू झालाय. गाझीपूरचे आंदोलन हे बंडखोर किंवा देशद्रोह्यांचे नाही. ते आपल्या हाडामांसाचे शेतकरी आहेत. ते ‘जयहिंद’चा नारा देत लढत आहेत' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन करत आहे. परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनाच्या बाजूने ट्वीट केल्यामुळे एकच गदारोळ उठला आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं; बिबट्यानं मगरीची केली शिकार; पाहा VIDEO

'जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले. शेतकऱ्यांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढ्यास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत' असं परखड मत राऊत यांनी व्यक्त केलं.

'अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक हिंदुस्थानी नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱ्यांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा' असा सल्लाही राऊत यांनी मोदींना दिला.

दारुबंदी अधिक कडक; एखादी जरी बाटली सापडली तरी दुकान जप्त करुन होणार लिलाव

दिल्ली-गाझीपूर हा एक तासाचा प्रवास. तेथे धड पोहोचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलीस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे. हे सर्व कोणाच्या विरोधात? तर आपल्याच शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱ्यांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते, पण शेतकऱ्यांना ती संधी नाही' अशी टीका राऊत यांनी केली.

'गाझीपूरच्या युद्धभूमीचे सेनापती राकेश टिकैत स्वागतासाठी समोर आले. त्यांनी आलिंगन दिले. ‘‘लढाई आता संपणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील. सरकारची तीच इच्छा दिसते,’’ असे ते म्हणाले. पश्चिम-उत्तर प्रदेशातील मेरठचा हा जाट नेता. त्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे वळवले आहे. भव्य देहयष्टी, मजबूत मनगट, रांगडे वागणे, अंगात खादीचा कुर्ता, धोतर व डोक्यावर किसान युनियनची हिरवी टोपी. पण मनात शेतकऱ्यांविषयी अपार माया, असे हे टिकैत. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढा द्यायला शेकडो किसान गाझीपुरात उतरले. ‘‘ही लढाई किमान ऑक्टोबर महिन्यापर्यंत तरी चालेल, पुढेही चालवू,’’ हा त्यांचा आत्मविश्वास, असंही राऊत यांनी सांगितले.

26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी काही लोक लाल किल्ल्यावर गेले. त्यांचा शेतकरी आंदोलकांशी काय संबंध? हा टिकैत यांचा प्रश्न. जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करा, ही त्यांची मागणी. पण गुन्हेगारांना राजकीय संरक्षण आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील 235 तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या 140 जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केले? असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केले.

'पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

First published: