मुंबई, 04 जून: मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे तीन तास मुंबई, ठाणे, उपनगर, पालघर, रायगडमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत इंटरनेट कनेक्शची समस्या निर्माण झाली तर वीज पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
चक्रीवादळानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात बुधवारी झाडं कोसळल्यानं आणि इमारतींचे पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गुरुवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. 3 तास सलग पावसाचा जोर कायम असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra: Rain lashes parts of Thane; India Meteorological Department (IMD) has predicted maximum temperature of 36°C in the city for today. pic.twitter.com/eM9n1kGbjx
More teams of National Disaster Response Force (NDRF) moved to Raigad for restoration work post #CycloneNisarga. Total 20 teams deployed across Maharashtra, 7 teams each in Raigad & Mumbai for restoration work: Satya Pradhan, Director General of NDRF pic.twitter.com/x1Uh2dtgd4
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अत्यवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. विजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे.
दक्षिण मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे तीन तास पावसाचा जोर कायम राहिलं असा अंदाज हवामान विभाकडून वर्तवण्यात आला आहे. वसई-विरारमध्ये गुरुवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली. वसईत 22 मीमी माणिकपूर 24 मिमी मांडवी 24 मिमी ,विरार 26 निर्मळ 19 मिमी,पावसाची नोंद झाली असून बुधवारपासू पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.