मुंबई, 19 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या तपास सीबीआयकडे सुपूर्द केल्यानंतर उद्या सीबीआय अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र मुंबईत आल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी बिहार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला मुंबई पालिकेने क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांवर सुशांतच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला होता. विरोधकांनीही निशाणा साधत मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणार का? याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
If CBI team comes for 7 days they'll be automatically exempted from quarantine & if they come for more than seven days period then they have to apply for exemption through our email id & we'll exempt them: Iqbal Singh Chahal, Commissioner, Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की जर सीबीआयची टीम केवळ 7 दिवसांसाठी मुंबई आली तर त्यांना क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्यात येईल. मात्र 7 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी ते मुंबईत येणार असतील तर त्यांना क्वारंटाईनमधून सूट मिळविण्यासाठी मेल करावा लागेल. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमधून सूट दिली जाईल.
If CBI team comes for 7 days they'll be automatically exempted from quarantine if carrying confirmed return ticket, as per MCGM's existing quarantine guidelines. If they come for more than 7 days they've to apply for exemption via our email id, we'll exempt them: BMC Commissioner https://t.co/gwjux3EwSq
सीबीआयच्या टीमकडे सात दिवसांचं रिटर्न तिकीट असेल तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. त्याहून अधिक काळासाठी मुंबईत येणार असतील तर त्यांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल.