राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याचे तसंच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी सुद्धा अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये ठेवण्यात आले होते. चार दिवस तिथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली होती.While deciding on the matter today, it is our humble request to the Hon High Court to take suo moto cognizance of the way MVA State Government in Maharashtra has treated Arnab Goswami during the entire process of arrest to handling under custody, as alleged by him.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis