मुंबई, 30 जून: पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session of Maharashtra) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत (Assembly Speaker) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली आहे.
विधानपरिषदेचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून पद रिक्त आहे याची आठवण करुन देण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे.
कोरोना काळात प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात पंतनं लुटला Euro चा आनंद, पाहा PHOTOS
या आधीही राज्यपाल कोश्यारी यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या रिक्त संदर्भात राज्य सरकाराला पत्र पाठवले होते. पण, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होत आहे. त्याआधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडी सरकारला स्मरण करून दिले आहे.
बैठक प्रकरणावरून पुण्याचे महापौर पुन्हा भडकले, राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली होती. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा तसंच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक याबद्दल निवेदन दिले होते. आज याच संदर्भात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Governor bhagat singh, Maharashtra, Mumbai, राज्यपाल