मुंबई, 09 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (anvay naik suicide case) अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे (Republic TV editor ) संपादक अर्णब गोस्वामींची (arnab goswami) रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी भाजपच्या नेत्यांनी आंदोलनांपासून ते मंदिरांचे उंबरठे झिझवले आहे. आता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याचे तसंच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी सुद्धा अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
मोठी बातमी! अखेर एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन म्हणून ठेवण्यात आले होते. चार दिवस कोरोना सेंटरमध्ये पाहुणचार घेतल्यानंतर गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
फटाके फोडताना घ्या काळजी, या फटाक्यांनी वायू आणि ध्वनी प्रदूषण होतं कमी
तर दुसरीकडे गोस्वामी यांच्या विरुद्ध अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनीही FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामींवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असे आरोप करत गुन्हा दाखल आहे.
काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.