मुंबई, 14 मार्च: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पूल दुर्घटनेप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या दुर्घटनेला मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केला आहे. याआधी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आम्ही सरकारकडे मुंबईतील सर्व पुलांचे अॅडिट करुन त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. पण सरकारला जाग आली नाही, असे ही पठाण म्हणाले.
LIVE Mumbai Bridge Collapse : CSMT पादचारी पूल कोसळला : 3 ठार; किमान 34 जखमी
या पुलाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई पालिकेकडे होती. पालिकेकडे 35 हजार कोटींचे बजेट आहे. पण त्यांना या पुलाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकारला पुतळे बांधण्यासाठी वेळ आहे. पण सर्व सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी वेळ नाही. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना तातडीने निलंबित करावेत, अशी मागणी पठाण यांनी केली.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकार आर्थिक मदत करेल पण त्याचा उपयोग नाही असे पठाण म्हणाले. सरकारने अॅडीट केले पण दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केलं आहे.
Deeply anguished by the loss of lives due to the foot overbridge accident in Mumbai. My thoughts are with the bereaved families. Wishing that the injured recover at the earliest. The Maharashtra Government is providing all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2019
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
Maharashtra CM: It's unfortunate. I've ordered for a high level inquiry. A structural audit of the bridge had earlier been done&it was found to be fit. Even after that if such incident happened, it raises question on the audit. Inquiry will be done. Strictest action will be taken pic.twitter.com/h7qHQXKWqb
— ANI (@ANI) March 14, 2019
संबंधित बातमी-
PHOTO थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल
मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO
मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO