रत्नागिरी, 22 एप्रिल : रत्नागिरीमधील (Ratnagiri News) संगमेश्वर येथे गारांचा पाऊस पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे चिपळूण मधील खेरशेत नायशी कोकरे भागातही गारांच्या पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. गाऱ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाच्या जोरामुळे मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत. असह्य उष्णतेमुळे त्रासलेले नागरिक सुखावले असले तरी बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर आंबा उत्पादनाची मोठी चिंता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा-Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र ते मराठवाडा, अवकाळी पावसाचा अंदाज, वीजाही चमकणार, वेगाने वारेही वाहणार
दुसरीकडे चिपळूणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. चिपळूणसह संगमेश्वर आणि गुहागरमधील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गुहागरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.