मुंबई, 01 डिसेंबर : भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे पंकजा यांनी कोरोनाची (Corona) परिस्थिती पाहता आयोसेलट (isolate) होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, पंकजा यांनी पदवीधर निवडणुकीच्या teacher and graduate constituency election 2020) मतदानासाठी औरंगाबादच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आहे. 'सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे' असं पंकजा यांनी सांगितले आहे. कोरोनाची (Corona) परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांनी खबरदारी म्हणून आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे.
पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी..
तसंच आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंकजा मुंडे यांची औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे पंकजा यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे' असं आवाहन केले आहे.
तसंच, 'अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी' असं सूचक विधानही पंकजा यांनी केले आहे.
औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी पाहण्यास मिळाली आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी जाहीरपणे बंडखोरी करत नवी चूल मांडली आहे. एवढंच नाहीतर बीडमधील माजी खासदार आणि मंत्री जयसिंग गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचारही जयसिंग गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी प्रथमच राज्यस्तरीय एकत्रित निवडणूक तीन पक्ष लढवत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होतानाच तीन पक्षात संघटनात्मक ऐक्य निवडणुकीत आहे का यांचे चित्र स्पष्ट होईल.
बिहार निवडणुकीनंतर राज्यात भाजप यशस्वी कामगिरी करत असल्याचे चित्र फडणवीस यांना निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ही दाखवण्याची संधी आघाडीच्या नेत्यांना आहे.
अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर या नेत्यांनी प्रचार करत राजकीय आरोपाच्या फेरी झाडल्या आहे. त्यामुळे आता मतदान कुणाच्या पारड्यात पडत हे पाहण्याचे ठरणार आहे.