हेही वाचा-कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहेत. तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-देशात कोविड लसीचा बूस्टर डोस?, आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट; म्हणाले... परतीचा पाऊस लांबणार यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील पिकं काढणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. परतीच्या पावसामुळे दरवर्षी पिके पाण्यात जाण्याचा धोका असतो. पण यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याने पिकांची काढणी करता येणार आहे. यंदा 15 दिवस उशीरा राज्यस्थानमधून परतीचा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही परतीचा पाऊस उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे.IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0Sy8D1Ng4j
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2021