मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुकेश अंबानींच्या नेतृत्वात 20 वर्षांत RILचा नफा 20 पटीने वाढला, गुंतवणूकदारही झाले मालामाल

मुकेश अंबानींच्या नेतृत्वात 20 वर्षांत RILचा नफा 20 पटीने वाढला, गुंतवणूकदारही झाले मालामाल

अंबानींच्या नेतृत्वात 20 वर्षांत RILचा नफा 20 पटीने वाढला

अंबानींच्या नेतृत्वात 20 वर्षांत RILचा नफा 20 पटीने वाढला

मुकेश अंबानी 20 वर्षांपूर्वी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले होते. रिलायन्सची कमान हाती घेताच यशाचे झेंडे फडकवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : उद्योजक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर आल्यानंतर 20 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. रिलायन्सची कमांड हाती घेताच यशाचे झेंडे फडकवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने गेल्या दोन दशकांमध्ये महसूल, नफा तसेच बाजार भांडवलात सातत्यपूर्ण दुहेरी अंकी वाढीचा दर गाठला आहे. या कालावधीत कंपनीचे बाजार भांडवल 42 पटीने वाढले असून नफा जवळपास 20 पटीने वाढला आहे.

मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्सच्या परिवर्तनाचे नायक नाहीत, त्यांच्या नेतृत्वात म्हणजेच गेल्या 20 वर्षात गुंतवणूकदारांवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला आहे. प्रतिवर्षी 87 हजार कोटी या दराने गुंतवणूकदारांच्या खिशात 17.4 लाख कोटी रुपये आले. दरम्यान, रिलायन्सला जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक मिळाली. फेसबुक, गुगल आणि बीपी सारख्या मोठ्या कंपन्या रिलायन्सच्या दारात उभ्या आहेत.

कंपनीने अनेक टप्पे गाठले

देशातील सर्वात मोठ्या कंपनीच्या यशोगाथेचे अनेक महत्त्वाचे अध्याय मुकेश अंबानी यांनी स्वत:च्या हाताने लिहिले आहेत. तेलापासून सुरुवात करून कंपनीने दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात अनेक टप्पे गाठले आहेत. डेटाला 'न्यू ऑयल' म्हणणारे मुकेश अंबानी हे पहिले होते. आणि डेटाने देशातील सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन किती बदलले आहे हे सांगण्याची गरज नाही. अंबानींनी रिलायन्स जिओची स्थापना केली, ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने फार कमी वेळात यशाचा झेंडा उंचावला. जिओच्या आगमनानंतर देशाने डिजिटल जगात जी घोडदौड सुरू केली, ते पाहून जगही आर्श्चयचकित झाले.

वाचा - Ratan Tata : हजारो कोटींची संपत्ती असूनही श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये रतन टाटांचा नंबर सर्वांत खाली का?

आज सर्वाधिक डिजिटल व्यवहारांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. हातगाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत डिजिटल पेमेंटची सुविधा आहे. यामागे सरकारचे प्रयत्न आहेत, पण याचे संपूर्ण श्रेय रिलायन्स जिओलाही जाते. ज्याने नवीन रेषा ओढली. जिओच्या आगमनानंतर सुमारे 250 रुपये प्रति जीबी असलेला डेटा जवळपास 10 रुपयांपर्यंत घसरला आहे. डेटा वापरातही देशाने मोठी झेप घेतली आहे. 2016 मध्ये भारताने 150 व्या क्रमांकावरून सर्वांना मागे टाकत जगात पहिले स्थान मिळवले आहे.

अजूनही खूप बाकी आहे

रिटेल क्षेत्रातही रिलायन्स जगातील आघाडीच्या कंपन्यांना स्पर्धा देत आहे. ऑनलाइन असो वा ऑफलाइन, किरकोळ असो वा घाऊक, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने आपली पकड मजबूत केली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट सारख्या कंपन्या रिलायन्सला आपला प्रतिस्पर्धी मानतात. रिलायन्स रिटेलने चमकदार गतीने स्टोअर्स उघडले. विश्वास बसणार नाही, पण गेल्या वर्षी रिलायन्स रिटेलने एकाच दिवसात 7 स्टोअर्स उघडण्याचा विक्रम केला आहे. महसुलाच्या बाबतीतही ती देशातील पहिल्या क्रमांकाची रिटेल कंपनी बनली आहे.

व्हिजनरी मुकेश अंबानींच्या क्षमतेवर जगाचा विश्वास आहे, पण मुकेश अंबानी इथेच थांबणार नाहीत. भविष्यातील रिलायन्ससाठी त्यांनी आधीच स्वप्ने विणण्यास सुरुवात केली आहे. 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जामनगरमध्ये न्यू एनर्जीसाठी 5 गिगा कारखाने उभारले जात आहेत. रिलायन्स सौरऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या नवीन ऊर्जा स्रोतांवरही वेगाने काम करत आहे.

First published:

Tags: Mukesh ambani, Reliance