03 जुलै : वाखरीचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज लाखो वारकऱ्यांसमवेत पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. वाखरीच्या रिंगणामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.त्यात भर म्हणजे वारकऱ्यांचं माहेर असलेल्या पंढरीत आज ते विसावणार असल्यानं त्या आनंदात भर पडलीय.
पंढरीत आल्यावर चंद्रभागेत जायचं, स्नान करायचं आणि विठुरायाचं दर्शन घ्यायचं हा वारकऱ्यांचा नेम असतो.त्यामुळे पंढरीत आल्यानंतर वारकऱ्यांची पावलं चंद्रभागेकडे वळणार आहेत.राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आल्यानं सर्व पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा