मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला, नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप; स्मृती इराणींकडे केली तक्रार

यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला, नवनीत राणा यांचा खळबळजनक आरोप; स्मृती इराणींकडे केली तक्रार

अमरावतीच्या खासदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील महिला मंत्र्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी त्यांनी स्मृती इराणी यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

अमरावतीच्या खासदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील महिला मंत्र्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी त्यांनी स्मृती इराणी यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

अमरावतीच्या खासदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील महिला मंत्र्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी त्यांनी स्मृती इराणी यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

अमरावती, 13 ऑगस्ट: अमरावतीच्या (Amravati)खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. कुपोषणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप केले असून यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेटू घेतली आणि तक्रार केली आहे.

राणा यांनी इराणी यांची भेट घेऊन तक्रार केली की, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना सरकारतर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या तसंच महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे आणि कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम देण्यात आलं आहे.

काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; 3 दिवसातील दुसऱ्या घटनेनं खळबळ

इतकंच काय तर यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणानं मृत्यू होणं ही अत्यंत खेदजनक तसंच लाजिरवाणी बाब असल्याचंही राणा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपांवर यशोमती ठाकूर यांचं FB LIVE

नवनीत राणा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी फेसबूक लाईव्ह केलं. या लाईव्हमध्ये ठाकूर यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे.

यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्राच्या आणि अंगणवाडीताईंचा राणा यांनी अपमान केल्याचं ठाकूर म्हणाल्यात.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे, महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत बोलताना अँड ठाकूर म्हणाल्या, कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरी सुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे.

प्रँक करत होता युवक; अनोळखी व्यक्तीनं मध्येच येऊन जे केलं त्यानं VIDEO मध्ये आला मजेशीर ट्विस्ट

मेळघाटातील कुपोषणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं. आता ज्या ४९ बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय असं ही त्या म्हणाल्या.

‘या’ देशातल्या महिला असतात सर्वात सुंदर; पाहा भारताचा कितवा नंबर

खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आलंय असा सवाल ही अँड यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरूय.? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचं काम देण्यात आले होते, कोविडमुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.

First published:

Tags: Navneet Rana, Yashomati thakur