मुंबई, 25 जुलै: राज्यात गेल्या चार दिवसात पावसानं धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीमुळे कोकणातील (Kokan) अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण (Chiplun) महाड, खेड (Khed) तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी कोकण (Kokan Flood) मधली पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळीये गावातील घरांवर कोसळलेल्या दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी जाऊनही त्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावाला भेट देऊन पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आज येथील लोकांना आश्वस्त केले. pic.twitter.com/EJB7805L08
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
ही दुर्दैवी बाब आहे. केवळ एकच गोष्ट आम्ही परत आणू शकत नाही. ते म्हणजे मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही. मात्र जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देता येईल असा मला विश्वास वाटतो, असं नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Started from Mumbai to visit flood affected areas of Konkan with @Dev_Fadnavis ji @mipravindarekar ji@PMOIndia pic.twitter.com/sfOJ5ykAko
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे 42 कुटुंब उद्ध्वस्त झाली असून त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. या घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
Breaking News: बचावकार्य बोटच अडकली पुराच्या पाण्यात, Live Video
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात, अनेकांचा मृत्यू झालेला आहे. आज आम्ही या दुर्दैवी घटनेची पाहणी करायला आलोय आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रवीण दरेकर हे या ठिकाणी दुसऱ्यांदा आलेले आहेत. स्थानिकांना मदत मिळावी यासाठी अधिकारी, एनडीआरएफची पथकं चांगले काम करत आहेत. गावातील सरपंचांसोबत माझं बोलणं झालं आहे. आमचं गावातच कायमच पुनर्वसन करावं, अशी त्यांची मागणी असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.