सातारा, 24 ऑगस्ट: उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे पत्रकारांच्या समोर आले. भाजप प्रवेशाबद्दल मात्र त्यांनी तळ्यात मळ्यात उत्तर देत आहेत. राष्ट्रवादीच्या काळात जी कामं झाली नाहीत ती कामं भाजपच्या फडणवीस सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रवेशाबाबत उत्तर दिलं.