मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दुचाकीचा धक्का लागला म्हणून तलवारीने वार करून तरुणाचा घेतला जीव, यवतमाळमधील घटना

दुचाकीचा धक्का लागला म्हणून तलवारीने वार करून तरुणाचा घेतला जीव, यवतमाळमधील घटना

श्याम राठोड गावातून जात असताना गावातील एका तरुणाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे श्याम आणि आरोपी तरुणामध्ये वाद झाला.

श्याम राठोड गावातून जात असताना गावातील एका तरुणाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे श्याम आणि आरोपी तरुणामध्ये वाद झाला.

श्याम राठोड गावातून जात असताना गावातील एका तरुणाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे श्याम आणि आरोपी तरुणामध्ये वाद झाला.

 03 डिसेंबर : दुचाकीचा (bike) धक्का लागला म्हणून झालेल्या वादानंतर एक 22 वर्षीय तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील (Yavatmal ) पुसद तालुक्यामध्ये घडली आहे. टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या महागांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद तालुक्यातील काळी दौलत गावामध्ये ही घटना घडली. श्याम शेषराव राठोड (वय २२ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे.  या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला.  काली गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस दाखल झाले आहे.

महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, नेपाळी गँगच्या नांग्या ठेचण्यात यश

श्याम राठोड गावातून जात असताना गावातील एका तरुणाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे श्याम आणि आरोपी तरुणामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. याच वादातून आरोपी तरुणाने श्यामवर तलवारीने वार केला. वार वर्मी लागल्यामुळे श्यामचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताचा  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर श्यामचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी तरुण फरार झाला असून शोध घेतला जात आहे.  यावेळी घटनेमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली असून गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना

दरम्यान,  व्याजाने घेतलेल्या रक्कमेतील 2 हजार रुपयांवरून तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना वर्ध्यातील नागसेन नगर परिसरात घडली. शंभू सोनगडे असं मृत तरुणाचे नाव आहे. नागसेननगर येथील शंभू सोनगडे याची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी 5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 3 हजार रुपयांचा परतावा देखील केला होता.

डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ पाठवा अन् विनामूल्य तज्ज्ञांचा सल्ला

या रक्कमेतील 2 हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरीता आरोपी शैलेश येळणे हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने लवकरच परतावा करेल, असं सांगितलं. त्यावरून येळणे याने सोनगडे यांच्याशी वाद घातला.  वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला.  बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर गाडी नेली.

आरोपी शैलेश एवढ्यावरच थांबला नाही कर त्याने त्याच गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. घटना दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  या घटनेत गंभीर जखमी शंभू सोनगडे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान  त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी शैलेश याला अटक केली आहे.

First published:

Tags: Murder, हत्या