मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 39 आणि अपक्ष असे जवळपास 50 आमदार घेऊन बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं मानलं जात होतं. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने (BJP) धक्कातंत्राचा वापर केला.
महाविकासआघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार इतकी टोकाची प्रतिक्रिया देतील, असं वाटलं नव्हतं पण ते खरं ठरलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकांना बाहेर पडायला प्रभावित केलं. गुवाहाटीला एवढे आमदार नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली, असं पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचं बंड आधी ठरलं होतं का याची मला कल्पना नाही, पण तयारी असल्याशिवाय हे झालं नाही. सगळ्या गोष्टी एका दिवसात घडू शकत नाही. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर पूर्ण जबाबदारी टाकतात, ज्यावेळी 39 लोक राज्याच्या बाहेर जातात तेव्हा त्यांचं मन परिवर्तन कसं करणार, असा सवालही पवारांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार नाराज असल्याचं तुम्ही सांगितलं होतं का? असा प्रश्नही शरद पवारांना विचारण्यात आला, पण त्यांनी यावर बोलणं टाळलं.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.