मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Weather Forecast : राज्यात उन्हाळ्याची चाहूल आणखी काही दिवस, थंडी पुन्हा थैमान घालणार

Maharashtra Weather Forecast : राज्यात उन्हाळ्याची चाहूल आणखी काही दिवस, थंडी पुन्हा थैमान घालणार

महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे.

महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे.

महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून दिवसा उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत सोलापुरात 37.4 अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून त्यानंतर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात सतत्याने बदल होत आहेत. बुधवारपासून जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पुन्हा राज्यातील वातावरणात गारवा पसरण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यासह विदर्भात कमाल तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत नांदेड व धुळ्यात 37, परभणी 36.8, पुण्यात 36.4, जळगावात 36.5 तर औरंगाबादेत 36 अंश तापमानाची नोंद झाली.

हे ही वाचा : दुष्काळी खानापुरात स्ट्रॉबेरीची शेती, पाहा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, Photos

राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तर अचानक रात्री थंडी वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी (ता. 21) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. निफाड येथे गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमान 10 अंशांच्या पुढे गेले आहे. किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या किमान तापमानातील वाढीबरोबरच आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे ही वाचा : Nagpur News : मिरचीनं शेतकऱ्यांना हसवलं, निर्यात वाढल्यानं आले 'अच्छे दिन'

राज्यात मागच्या 24 तासांत विवीध शहरात तापमानाची झालेली नोंद : पुणे 35.2 (12.2), जळगाव 35.7 (10.7), धुळे 37.0 (12.0), कोल्हापूर 33.6 (19.5), महाबळेश्वर 31.6 (17.6), नाशिक 36.3 (13.2), सांगली 35.2 (12.2), सातारा 34.7 (15.0), सोलापूर 36.4 (18.6), सांताक्रुझ 36.1 (19.4), डहाणू 31.4 (17.5), रत्नागिरी 33.1 (20.0), औरंगाबाद 35.4 (13.8).

परभणी 35 .7(16.0), अकोला 38.5(15.6), अमरावती 36.8(14.9), बुलडाणा 35.0(18.2), ब्रम्हपुरी 36.3 (16.5), चंद्रपूर 35.2 (17.3), गडचिरोली 33.6 (14.6), गोंदिया 34.2 (14.5), नागपूर 35.9 (15.0), वर्धा36.5 (16.4), वाशिम 36.2 (15.0), यवतमाळ 36.2 (16.5).

First published:
top videos

    Tags: Aurangabad News, Kolhapur, Mumbai, Nagpur News, Sangli news, Satara news, Solapur news, Weather Forecast, Weather Update