मुंबई, 9 मार्च : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्याकडे कोणीही माफ करण्याची मागणी केली नव्हती. आम्ही ठरवू त्यांना माफ करायचं की नाही. एक हिंदुत्ववादी पक्ष यांनी केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करून फोडला. ही वेदना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात आला तरी तो कधीही स्विकार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?
संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक हिंदुत्ववादी पक्ष यांनी केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करून फोडला. ही वेदना महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. राज्यातील जनताच आता ठरवेल यांना माफ करायचं की नाही. राजकारणात मतभेद होत असतात पण यांनी बाळासाहेबांनी तयार केलेला अख्खा पक्षच फोडला. भाजपकडून हात आला तरी तो आता कधीही स्विकारल्या जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
'राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिल्यास स्वागत'; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेनं चर्चेला उधाण
मनसेला टोला
आज मनसेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनीची संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे. हे सर्व शिवसेनेचेच होते. शिवसेना आणि बाळासाहेब नसते तर आपण कुठे असतो याचं आत्मचिंतन या लोकांनी केलं पाहिजे. मूळ शिवसेना आपल्या जागेवरच आहे. भाजपनं ती विकली असली नावाने केली असली तरी मूळ शिवसेना ती मूळ शिवसेनाच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray