जालन्यात बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण आणि पक्षपात झाल्याचा आरोप अन्याय झालेल्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार (police Constable) गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी बदलीचा विनंती अर्ज केला होता. मात्र, आतापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवला. त्यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला. हे वाचा - OMG : दे धक्का.. रेल्वेला..! टॉवर वॅगनला लोकांनी ढकलत आणलं दुसऱ्या ट्रॅकवर या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून कुलकर्णी यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान सायंकाळी त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याचे सांगण्यात येत आहे.माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं जालना जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. pic.twitter.com/MHhdpbYy0r
— News18Lokmat (@News18lokmat) September 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra police, Police