बारामती, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी एनडीएत सामील होण्यासंबंधीचं वृत्तं आता स्वतः शरद पवारांनीच खोडून काढलंय. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही एकदाचा मिटलाय. मोदी आणि पवारांच्या मैत्रीमुळे गेल्या आठवड्यापासून यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. स्वतः शरद पवार यावर काहीच बोलत नसल्याने कार्यकर्त्यांची खुलासे देताना मोठी पंचाईत होत होती.
स्वाभिमानीचे बंडखोर मंत्री सदाभाऊ खोत यांनाही पवारांनी टोला लगावलायं. राजू शेट्टींनी एनडीए सोबतची युती तोडली तरी स्वाभिमानीच्या वाट्याचं मंत्रिपद सदाभाऊ खोत यांना सोडवत नाही, असा टोमणा पवारांनी हाणलाय. राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पवारांनी प्रथमच त्यांच्या भूमिकेचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. आणि सदाभाऊंना पुन्हा टार्गेट केलंय.
मुंबईतील पावसाच्या पूरस्थितीवरूनही शरद पवारांनी शिवसेनेला फटकारलंय. 26जुलैच्या पूरस्थितीतूनही मुंबई मनपाचा सत्ताधारी पक्षाने काहीच धडा घेतला त्यामुळेच मंगळवारी मुंबईतील सगळीकडे पाणी भरल्याचा आरोप पवारांनी केलाय.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.