या जहाजातील सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने सुखरुपपणे जहाजातून खाली उतरवण्यात आले आहे.हे मालवाहू जहाज सिमेंट घेऊन जात होते. पण, निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रात याचा निभावा लागला नाही. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच करण्यास सुरुवात केल्यामुळे सिंधुदुर्गात आता वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. पण हे वादळ जसं जसं पुढे जात आहे. तसा तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीला याचा तडाखा बसत आहे. रत्नागिरीतल्या दापोली गुहागर हर्णे भागात या ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे आणि पाउसही सुरू आहे.#निसर्गचक्रीवादळ #CycloneUpdate - रत्नागिरीत मालवाहतूक जहाज भरकटले#CycloneNisarg pic.twitter.com/wfIZsdhx1s
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ मुंबईत धडकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा धोका निर्णय झाला आहे. याआधी दोन वेळा 1948 आणि 1980 रोजी मुंबईला चक्रीवादळाचा धोका होता. 1980 रोजी आलेलं चक्रीवादळ समुद्रातच शांत झाल्यानं मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही मात्र 1948 रोजी आलेल्या वादळानं मुंबईला मोठा तडाखा बसला होता.#रत्नागिरी #निसर्ग #nisarg भरकटलेल्या जहाजातील कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी केली मोठी मदत बोटीतल्या लोकाना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढल जातय, जहाजाचं नाव MT Basara star आहे ठिकाण- मिऱ्या बंधारा @Dineshkel @InfoRatnagiri pic.twitter.com/IzeJzUAQVR
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.