मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शहादा बंदला हिंसक वळण, 4 ते 5 हजार शेतकऱ्यांचा पोलीस स्टेशनला घेराव

शहादा बंदला हिंसक वळण, 4 ते 5 हजार शेतकऱ्यांचा पोलीस स्टेशनला घेराव

लाठीचार्जचे आदेश नसतांना शेतकऱ्यांना जनावराप्रमाणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

लाठीचार्जचे आदेश नसतांना शेतकऱ्यांना जनावराप्रमाणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

लाठीचार्जचे आदेश नसतांना शेतकऱ्यांना जनावराप्रमाणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

    10 एप्रिल : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात हजारो संतप्त शेतकऱ्यांनी शहादा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. सुमारे 4 ते 5 हजार शेतकरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. या सर्व शेतकऱ्यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. रात्री उशिरा हे शेतकरी तिथून निघून गेले.

    लाठीचार्जचे आदेश नसतांना शेतकऱ्यांना जनावराप्रमाणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले होते त्याना गुंडाप्रमाणे वागणुक देत पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केलाय.

    दरम्यान, मनमानी पध्दतीनं गुन्हे दाखल करून घेत शेतकऱ्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी शेतरकऱ्यांनी केलाय. स्वाभीमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज शहाद्यात येत असल्यानं तालुक्यात वातावरण अधिकच तापलंय.

     

    First published:

    Tags: Farmer's protest, Nandurbar