मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /70 लाखांची कार, 8 एअर बॅग; मर्सिडीजने नेमका कुठे दगा दिला? कंपनीच्या टीमकडून तपासणी सुरू

70 लाखांची कार, 8 एअर बॅग; मर्सिडीजने नेमका कुठे दगा दिला? कंपनीच्या टीमकडून तपासणी सुरू

मर्सिडीज ही अत्यंत सुरक्षित कार मानली जाते. या कारमधून जाताना सायरस मिस्ट्री यांचा मृत्यू झाल्याने अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

मर्सिडीज ही अत्यंत सुरक्षित कार मानली जाते. या कारमधून जाताना सायरस मिस्ट्री यांचा मृत्यू झाल्याने अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

मर्सिडीज ही अत्यंत सुरक्षित कार मानली जाते. या कारमधून जाताना सायरस मिस्ट्री यांचा मृत्यू झाल्याने अनेकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. मिस्त्री मर्सिडीज कारने प्रवास करीत होते. ही कार खूप सुरक्षित मानली जाते. या कारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण फिचर्स आहे, ज्यामुळे अपघातानंतरही कारमध्ये बसलेले प्रवासी सुरक्षित राहतील. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक विविध प्रकारचे सवाल उपस्थित करीत आहेत.

इतकी सुरक्षित कार असतानाही कसा झाला मृत्यू?

ज्या मर्सिडीज कारने सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र प्रवास करीत होते, त्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात स्पष्ट दिसत आहे की, कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. ड्रायव्हर सीट आणि शेजारील सीटचंही नुकसान झालं आहे. कार ड्राइव्ह करणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोले आणि शेजारच्या सीटवर बसलेले पती गंभीर जखमी झाले आहेत.

पारशींचं पवित्र तीर्थस्थळाहून परतत असताना काळाचा घाला, सायरस मिस्त्रींसाठी ठरलं ते शेवटचं दर्शन

या अपघातात मागे बसलेले मिस्त्री आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कारच्या समोर बसलेल्यांना फार त्रास झाला नाही, मात्र मागे बसलेल्यांचा मृत्यू कसा झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागे बसलेल्या दोघांच्या मृत्यूचं नेमकं काय कारण आहे, याबाबत लोकांकडून शंका निर्माण केली जात आहे. विशेष म्हणजे मर्सिडीज कारमध्ये एकूण सात एअरबॅग्स असतात. मागच्या एअरबॅग्स का उघडल्या गेल्या नाहीत? दरम्यान कारची तपासणी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीकडून टीम पाठवण्यात आली आहे. हे कारची स्थितीची तपासणी करीत आहे. कारमधील फिचर्स व्यवस्थित काम करीत होते की, नाही याबाबत आणि इतक तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढे बसलेल्या दोघांनीही सीटबेल्ट लावला होता. मात्र मागे बसलेल्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. त्यामुळे जेव्हा कार डिव्हायरडला धडकली तेव्हा मागे बसलेले सायरस मिस्त्री पुढे आले आणि एअरबॅग उघडण्यापूर्वीच त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे असंही सांगितलं की, अपघातावेळी मिस्त्रींची कार दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करीत होती आणि कारची गतीही जास्त होती.

First published:
top videos

    Tags: Ratan tata, Road accident, Tata group