हे वाचा - ''मी माझ्यानुसार काम करतोय,राजकीय कोण काय बोलतो ते...'', गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भडकले भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गुढीपाडवा सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. या सभेला विरोधही होताना दिसत आहे. नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश काय? तर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.प्रार्थना स्थळांमध्ये CCTV यंत्रणा का असू नये?#MNSAdhikrut pic.twitter.com/Ml4lNti4H2
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 20, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, MNS, Raj Thackeray