पुणे, 23 ऑगस्ट: ईडी, सीबीआयची भीती दाखवून भाजपत प्रवेश सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. रांजणगाव इथल्या गणपतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेला सुरूवात केली. ही सर्व प्रकरणे विधानसभेच्या आधी का उघडकीला येतायेत, हा सत्तेचा गैरवापर आहे असंही त्या म्हणाल्या. आमच्याकडे असल्यावर वाईट आणि भाजपकडे गेल्यावर चांगले भाजपकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली. या यात्रेतील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या भागातील जनतेशी संवाद साधणार आहेत.