या घटनेनंतर NDRFच्या पथकाला मदतीसाठी बोलवण्यात आले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले तिवरे धरण रात्री 9 च्या सुमारास भरले होते. आधीच धरण भरले होते त्यात मुसळधार पावसामुळे रात्री फुटले. यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेली एक वाडीच वाहून गेली. धरण फुटल्यानंतर वाशिष्टी नदीला पुर आला असून अनेक गावांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाजवळचा दादर पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तर ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. तिवरे धरण फुटलं; 23 जण बेपत्ता, ही आहेत नावं असे आहे तिवरे धरण- तिवरे धरण हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे सदर धरणाची साठवणूक क्षमता 2.452 दशलक्ष घनमीटर / 0.08 टीएमसी येवढी आहे. सदर धरणाचे बांधकाम 2012 साली पूर्ण झाले आहे. सदर धरण फुटल्यामुळे तिवरे व धणेगाव यांना धोका आहे. पुढे जाऊन हे पाणी वाशिष्टी नदीला जाऊन मिळते. तेवरे धरण फुटले: काय झालं नेमकं काल रात्री धरण फुटणार याची कल्पना होती धरण फुटणार असल्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत निवेदन दिले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकटMaharashtra: Bodies of 2 persons have been recovered by civil administration after Tiware dam in Ratnagiri was breached. About 22-24 people are missing. 12 houses near the dam have been washed away. Civil administration, police and volunteers are present at the spot. pic.twitter.com/JN6VQYmsEL
— ANI (@ANI) July 3, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Ratnagiri