मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रात काँग्रेस भलतीच आक्रमक, आता थेट राजभवनाला घालणार घेराव

महाराष्ट्रात काँग्रेस भलतीच आक्रमक, आता थेट राजभवनाला घालणार घेराव

आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

नवी दिल्ली, 11 जानेवारी : 'केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील 40 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्यात येणार आहे,' असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निदर्यी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्र लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूटत आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी 16 तारखेला आंदोलन केले जाणार आहे.       

 'भाजपच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली'

शेतकरी प्रश्नासोबतच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात होत असलेल्या वाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरू केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करु नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने 73 वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर असलेली 9.20 रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने 32.98 रुपये केली आहे, लिटरमागे 23.78 रुपयांची वाढ म्हणजे तब्बल 258 टक्के वाढ तर डिझेलची मे 2014 मध्ये असलेली 3.46 रुपये एक्साईज ड्युटी आज 31.83 रुपये केली. म्हणजे प्रति लिटर 28.37 रुपये आणि 820 टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑईलचे दर 110 डॉलर प्रति बॅरलवरून 50 डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत 19 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे.

शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून 16 जानेवारीला ‘किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरु आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे आणि यापुढेही भाजपा सरकारला जागे करण्यासाठी संघर्ष करत राहू,' असंही थोरात म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Balasaheb thorat, Congress