मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या, विधानपरिषदेत राज्य सरकारचं लेखी उत्तर

शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या, विधानपरिषदेत राज्य सरकारचं लेखी उत्तर

shashikant varise

shashikant varise

सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना शशिकांत वारिसे यांचा अपघात घडवून आणला गेल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाल्याचं सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. रिफायनरीविरोधात बातम्या प्रकाशीत केल्यानं त्यांची हत्या झाल्याची शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. यावर सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना शशिकांत वारिसे यांचा अपघात घडवून आणला गेल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.

विधान परिषदेत विरोधकांनी शशिकांत वारिसे प्रकरणी लेखी प्रश्न सरकारला विचारला होता. यावर लेखी उत्तरात शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची अखेर सरकारची कबुली दिलीय. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारकडून लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे.

आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाहीय, अवकाळी पाऊस अन् गारपीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

शशिकांत वारिसे यांचा ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाला पेट्रोल पंपासमोर एका वाहनाने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं निधन झालं होतं. शशिकांत वारिसे यांना पंढरीनाथ अंबेरकरने अपघात घडवून हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. रिफायनरीमध्ये आंबेरकरच्या जमिनी असल्याचा आरोपही होतोय.

First published:
top videos

    Tags: Ratnagiri