गडचिरोली, 21 मे: आताची सगळ्यात मोठी बातमी गडचिरोलीतून (Gadchiroli) समोर येते आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही याठिकाणी सर्च ऑपरेशन आणि चकमक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान तेरा माओवाद्यांना ठार करण्यात आल्याने, पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. कारण कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 2018 मध्ये 40 माओवादी कसनासूर चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आज 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
गडचिरोली जिल्हयात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. सुरुवातीला आठ ते दहा नक्षलवाद्यांना ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा आकडा 13 वर गेला आहे. पैदीच्या जंगलात अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असणाऱ्या या परिसरात काल रात्रीपासून चकमक सुरू आहे.
Maharashtra: Bodies of at least six Naxals recovered in the forest area of Etapalli, Gadchiroli in an ongoing encounter between the C-60 unit of Maharashtra Police and Naxals. More details awaited.
— ANI (@ANI) May 21, 2021
एटापल्लीच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे 6 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. गडचिरोलीचे डीआईजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जणांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.