संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)कराड, 03 ऑक्टोबर: राज्यातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करायची हा आमचा विचार आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार आहे. या निवडणुकीत कुठल्याही भावनात्मक प्रश्नांवर विचार न करता सामान्यांचे पोटापाण्याचे प्रश्न, विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढवणाऱ्यांना मत द्यावं असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.