मुक्ताईनगर 10 सप्टेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुक्ताईनगर इथं झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टीका केली. खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांना मी शुभेच्छा देत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व आमचं अलायन्स असून त्यामुळे निश्चितच सरकार येईल.
मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण खेळल्या गेलं ते बिहारमध्ये खेळल्या जाऊ नये. याचं त्याचं तिकीट काढून याला द्यायचं, दुसऱ्याला पाडायचं असं बिहारमध्ये होऊ नये असंही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती.
महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला होता.
जळगाव मुक्ताईनगर- महाराष्ट्रात पाडापाडीचं राजकारण केलं तसं बिहारमध्ये करू नका. एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल. pic.twitter.com/0lfmXIMA6A
— News18Lokmat (@News18lokmat) September 10, 2020
तसेच 10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला होता.
भाजपला बसला आयरामांचा फटका
राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना 123 भाजप आमदार निवडून आणले. मात्र, युती झाल्यावर 107 कसे झाले? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे.
मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार, दुसऱ्या टप्प्यासाठी येणार 10 METRO ट्रेन्स
मी पून्हा येईन, मी पुन्हा येईल... हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळं असताना पराभव झालाच कसा? असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याची गौप्यस्फोट खडसेंनी यावेळी केला. मात्र, आपण भाजप सोडणार नाही. कारण पक्ष आम्ही उभा केला, असं देखील खडसेंनी सांगितलं होतं.
आणखी काय म्हणाले होते खडसे...?
खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन पक्ष उभारणी केली होती.
'या' मुद्द्यांमुळे मुंबईच्या महापौर अडकणार? भाजपची अविश्वास प्रस्तावाची तयारी
मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असा टोलाही खडसेंना स्वपक्षीयांना लगावला होता.
भावना आणि संतापाचा कधी स्फोट होऊ शकतो...
एकनाथ खडसे म्हणाले, 'मी गेली40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र, पक्षानं माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कधी स्फोट होईल, हे मी सांगू शकत नाही, भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितल होतं.