मुंबई, 21 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल
एकूण जागा - 288
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी - 41
कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?
पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा - 58
भाजप - 19
शिवसेना - 12
काँग्रेस - 7
राष्ट्रवादी - 16
इतर - 4
उत्तर महाराष्ट्र
एकूण जागा - 47
भाजप - 19
शिवसेना - 8
काँग्रेस - 10
राष्ट्रवादी - 8
इतर - 2
मराठवाडा
एकूण जागा - 46
भाजप - 15
शिवसेना - 11
काँग्रेस - 9
राष्ट्रवादी - 8
इतर - 3
विदर्भ
एकूण जागा - 62
भाजप - 44
शिवसेना - 4
काँग्रेस - 10
राष्ट्रवादी - 1
इतर - 3
कोकण
एकूण जागा - 75
भाजप - 25
शिवसेना - 28
काँग्रेस - 6
राष्ट्रवादी - 8
इतर - 8
VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया